Tuesday, December 21, 2010
Monday, August 16, 2010
खड्ड्यातील करोडपती
रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता अशी मुंबईपासून ठाण्याच्या रस्त्यांची स्थिती आहे. सामान्य माणूस खड्ड्यांनी त्रस्त आहे. गाडीवाले संतप्त आहेत. पण किमान 25 जण या खड्ड्यांमुळे सुखी आहेत. कारण दरवर्षी तेच तेच खड्डे बुजवून हे सर्वजण करोडपति झाले आहेत. खड्ड्यांतही भ्रष्टाचार सुरू आहे! बिनदिक्कतपणे आणि राजरोस भ्रष्टाचार होत आहे. कनिष्ठांपासून दोन टक्क्यांनी सुरूवात होते आणि अगदी स्थानिक उपद्रवापासून सर्वांना मिळून 20 टक्के वाटले जातात. उर्वरित 80 टक्क्यांत 30 टक्क्यांचे काम होते आणि 50 टक्के थेट कंत्राटदाराच्या घशात जातात. खोटी बिले, वाढीव दर सर्वकाही होते. खड्डा बुजविणे हा प्रकार भ्रष्टाचारात पूर्ण आकंठ बुडाला आहे. सर्वच धक्कादायक आणि सुन्न करणारे आहे. भ्रष्टाचाराचे प्रकार पुढेे वाचाल तेव्हा थक्क होऊन वासलेला तुमचा जबडा बंद होणार नाही.
परप्रांतिय कंत्राटदारांची रिंग
बृहन्मुंबई महापालिकेत खड्डे बुजविण्याचे कंत्राट सातत्याने मूठभर कंत्राटदारांनाच दिले जाते. यातील एखादा सोडला तर सर्व कंत्राटदार परप्रांतिय आहेत. या कंत्राटदारांनी रिंग म्हणजे कंपू बनविला आहे. एका माणसाच्या वेगवेगळ्या नावाने कंपन्या आहेत आणि या नवनवीन नावाच्या कंपन्यांना बरोबर कंत्राटे मिळतात. बाहेरच्याला येऊच दिले जात नाही.
एखादा मराठी कंत्राटदार प्रयत्न करू लागला तरी यशस्वी होत नाही. कारण पालिकेनेच त्यासाठी बंदोबस्त केला आहे. मराठी माणसाला एखाद्या रस्त्याचे काम घेणे झेपू शकते. कारण त्यासाठी लागणारी ठेव आणि इसारा रक्कम भरायची असते ती त्याच्या आवाक्यात असते. पण पालिका अशा तऱ्हेने कामे विभागून देत नाही. एकदम पाच रस्त्यांचे काम घ्यावे लागते. म्हणजे त्यासाठी सुरक्षा ठेव मोठी आणि इसारा रक्कम मोठी असते. इतके पैसे कुठून आणणार? मराठी माणूस माघार घेतो आणि परप्रांतीय मेवा खातो. पालिका असे नियम करून मराठी माणसांना डावलते आणि मग मराठी माणसे पुढे येत नाहीत, अशी बोंब मारायला मोकळे.
मराठी माणसे चाकर बनविली
दुर्दैव असे की, खड्डे बुजविण्याचे काम ज्या 25 कंत्राटदारांच्या रिंगणात फिरते त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व मराठीच आहेत. पैसा परप्रांतीयांचा असतो. त्यांच्यासाठी मराठी माणसे राबत आहेत. कागदपत्रे तयार करण्यापासून खड्डे बुजविण्याची सर्व कामे परप्रांतियांच्या हाताखालची मराठी माणसेच करतात. केवळ साम, दाम, दंड, भेद वापरून निर्लज्ज भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून मराठी माणसाला एकही कंत्राट मिळत नाही.
2008-09 साली खड्डे बुजवायला 25 कोटी 27 लाख 25 हजार रूपये खर्च झाले. तरी पुढील वर्षी खड्डे होतेच. 2009-10 साली पालिकेने 33 कोटी खर्च केले. तरी पुढील वर्षी खड्डे आहेत. आता तर 2010-11 वर्षासाठी पालिका खड्डे बुजविण्यावर 40 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा काय प्रकार आहे? आपण दिवसभर कष्ट करून घाम गाळून पालिकेकडे कर भरतो आणि आपल्या घामाचे पैसे पालिका अशी खड्ड्यात घालणार? परप्रांतियांच्या घशात ओतणार? या भयंकर भ्रष्टाचाराचा एकेक प्रकार वाचताना तुमचे रक्त पेटलेच पाहिजे.
दरवर्षी खड्डे पडलेच पाहिजेत
2007 साली खड्डे बुजविण्याचे कार्बन कोअर नांवाचे नवीन तंत्रज्ञान आणले. पण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडणार नाही म्हणून कंत्राटदार लॉबीने या तंत्रज्ञानाला विरोध केला. 2008-09 साली मॅट्रीक्स हे दुसरे चांगले तंत्रज्ञान आणले तर त्यालाही विरोध झाला. 2009-10 साली जेट पॅचर मशीन आणण्याचा निर्णय झाला. योग्य दाब टाकून बिटूमेन व इतर पदार्थ वापरून व्यवस्थित खड्डे बुजविणारे उत्तम यंत्र आहे. पण ही मशीन आणण्यात फार मोठा धक्कादायक प्रकार केला गेला.
संपूर्ण मुंबई आणि पूर्व व पश्चिम उपनगर इतक्या विस्तारीत परिसरासाठी केवळ 3 मशीन घेतल्या. या मशीन जर्मनीच्या कंपनीकडून थेट विकत न घेता एका कंत्राटदाराच्या कंपनीमार्फत घेतल्या. जर्मनीच्या या मशीनची किंमत प्रत्येकी 50 लाख रुपये आहे. पालिकेने मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत 72 लाख रुपये प्रत्येकी या दराने मशीने विकत घेतली! 22 लाख रुपये प्रत्येक मशीनमागे अधिक का लागले?
त्याहून भयानक प्रकार पुढे आहे. ही तीन जेट पॅचर मशीन घेतल्यानंतर वर्षभरातच तीनही मशीन मेन्टेनन्सला काढली. तीन मशीन प्रत्येकी 72 लाख रुपयाला विकत घेतली. त्याच्या मेन्टेनन्सवर खर्च किती? 68 कोटी रुपये!!
थक्क झालात ना? 68 कोटी रुपयांत आणखी किती नवीन मशीन आल्या असत्या त्याचा हिशेब करायला लागलात? आम्हाला आधी हा आकडाच चुकीचा वाटला. पण माहिती देणाऱ्याने दोनदोनदा ठामपणे सांगितले की, 68 कोटी रुपये मेन्टेनन्ससाठी पालिकेने दिलेही आहेत. आम्ही म्हटले, 68 लाख असतील. पण नाही! 68 कोटीच मेन्टेनन्सवर खर्च केले आहेत.
कमी रकमेच्या निविदांचा घोळ
खड्डे बुजविण्यात इतका भ्रष्टाचार तर रस्ते बांधणीत किती असेल याचा विचार करा. खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज पालिका अभियंता काढतो. त्यांनी काढलेल्या अंदाजावरून निविदेची किमान रक्कम ठरते. पालिकेचा अभियंता रक्कम निश्चित करतो म्हणजे ती योग्यच असते. पण कंत्राटदार त्यापेक्षा कमी किंमतीत निविदा भरतात. या कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे काम कसे होऊ शकते हे न विचारता किमान रक्कमेपेक्षाही कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराला काम देतात. यासाठी कंत्राटदार संपूर्ण कामाच्या 20 टक्के रक्कम वाटतो. मग काही काळाने हाच कंत्राटदार वाढीव रक्कम दाखवित खर्चाचा सुधारित अंदाज (एस्टीमेट रिव्हाईज) भरतो. ही वाढीव रक्कम लगेच मंजूर होते. म्हणजे कंत्राटदाराला काहीच तोटा होत नाही.
त्यानंतर कंत्राटदाराची कमाई सुरू होते. कंत्राटदार आणि पालिकेतील भ्रष्टाचारी या कमाईला अऊ आयटम (म्हणजे वेड्यातील येडी) असे म्हणतात. रस्ता करायचा असेल तर तो मजबूत करायला चार थर टाकावे लागतात. कंत्राटदार चार थर टाकण्याऐवजी दोनच थर टाकतो. एकदा रस्ता झाला की, किती थर टाकले ते सांगता येत नाही. त्यामुळे दोन थर टाकायचे, चार थराचे बिल लावायचे आणि न टाकलेल्या दोन थराचे पैसे थेट खिशात घालायचे. असे हे चार थरांचे खोटे बिल देताना "ये एडी आयटम है' असे म्हणतात.
मनसेचे रस्ते व आस्थापना विभागाचे प्रमुख संघटक योगेश परुळेकर आणि सरचिटणीस गौरव वालावलकर यांनी माहिती अधिकाराखाली ही सर्व भयानक व्यूहरचना खणून काढली. पत्रकार कीर्तीकुमार शिंदे यांनी प्रकाश टाकला आणि आज पालिका कंत्राटदारांचे कारस्थान "नवाकाळ' वाचकांसमोर मांडत आहे. भ्रष्टाचाराच्या कीडीने सर्व पोखरले गेले आहे हेच धगधगते सत्य आहे.
परप्रांतिय कंत्राटदारांची रिंग
बृहन्मुंबई महापालिकेत खड्डे बुजविण्याचे कंत्राट सातत्याने मूठभर कंत्राटदारांनाच दिले जाते. यातील एखादा सोडला तर सर्व कंत्राटदार परप्रांतिय आहेत. या कंत्राटदारांनी रिंग म्हणजे कंपू बनविला आहे. एका माणसाच्या वेगवेगळ्या नावाने कंपन्या आहेत आणि या नवनवीन नावाच्या कंपन्यांना बरोबर कंत्राटे मिळतात. बाहेरच्याला येऊच दिले जात नाही.
एखादा मराठी कंत्राटदार प्रयत्न करू लागला तरी यशस्वी होत नाही. कारण पालिकेनेच त्यासाठी बंदोबस्त केला आहे. मराठी माणसाला एखाद्या रस्त्याचे काम घेणे झेपू शकते. कारण त्यासाठी लागणारी ठेव आणि इसारा रक्कम भरायची असते ती त्याच्या आवाक्यात असते. पण पालिका अशा तऱ्हेने कामे विभागून देत नाही. एकदम पाच रस्त्यांचे काम घ्यावे लागते. म्हणजे त्यासाठी सुरक्षा ठेव मोठी आणि इसारा रक्कम मोठी असते. इतके पैसे कुठून आणणार? मराठी माणूस माघार घेतो आणि परप्रांतीय मेवा खातो. पालिका असे नियम करून मराठी माणसांना डावलते आणि मग मराठी माणसे पुढे येत नाहीत, अशी बोंब मारायला मोकळे.
मराठी माणसे चाकर बनविली
दुर्दैव असे की, खड्डे बुजविण्याचे काम ज्या 25 कंत्राटदारांच्या रिंगणात फिरते त्यांच्या हाताखाली काम करणारे सर्व मराठीच आहेत. पैसा परप्रांतीयांचा असतो. त्यांच्यासाठी मराठी माणसे राबत आहेत. कागदपत्रे तयार करण्यापासून खड्डे बुजविण्याची सर्व कामे परप्रांतियांच्या हाताखालची मराठी माणसेच करतात. केवळ साम, दाम, दंड, भेद वापरून निर्लज्ज भ्रष्टाचार करता येत नाही, म्हणून मराठी माणसाला एकही कंत्राट मिळत नाही.
2008-09 साली खड्डे बुजवायला 25 कोटी 27 लाख 25 हजार रूपये खर्च झाले. तरी पुढील वर्षी खड्डे होतेच. 2009-10 साली पालिकेने 33 कोटी खर्च केले. तरी पुढील वर्षी खड्डे आहेत. आता तर 2010-11 वर्षासाठी पालिका खड्डे बुजविण्यावर 40 कोटी रुपये खर्च करणार आहे. हा काय प्रकार आहे? आपण दिवसभर कष्ट करून घाम गाळून पालिकेकडे कर भरतो आणि आपल्या घामाचे पैसे पालिका अशी खड्ड्यात घालणार? परप्रांतियांच्या घशात ओतणार? या भयंकर भ्रष्टाचाराचा एकेक प्रकार वाचताना तुमचे रक्त पेटलेच पाहिजे.
दरवर्षी खड्डे पडलेच पाहिजेत
2007 साली खड्डे बुजविण्याचे कार्बन कोअर नांवाचे नवीन तंत्रज्ञान आणले. पण हे तंत्रज्ञान वापरले तर त्याच ठिकाणी पुन्हा खड्डे पडणार नाही म्हणून कंत्राटदार लॉबीने या तंत्रज्ञानाला विरोध केला. 2008-09 साली मॅट्रीक्स हे दुसरे चांगले तंत्रज्ञान आणले तर त्यालाही विरोध झाला. 2009-10 साली जेट पॅचर मशीन आणण्याचा निर्णय झाला. योग्य दाब टाकून बिटूमेन व इतर पदार्थ वापरून व्यवस्थित खड्डे बुजविणारे उत्तम यंत्र आहे. पण ही मशीन आणण्यात फार मोठा धक्कादायक प्रकार केला गेला.
संपूर्ण मुंबई आणि पूर्व व पश्चिम उपनगर इतक्या विस्तारीत परिसरासाठी केवळ 3 मशीन घेतल्या. या मशीन जर्मनीच्या कंपनीकडून थेट विकत न घेता एका कंत्राटदाराच्या कंपनीमार्फत घेतल्या. जर्मनीच्या या मशीनची किंमत प्रत्येकी 50 लाख रुपये आहे. पालिकेने मे. स्पेको इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीमार्फत 72 लाख रुपये प्रत्येकी या दराने मशीने विकत घेतली! 22 लाख रुपये प्रत्येक मशीनमागे अधिक का लागले?
त्याहून भयानक प्रकार पुढे आहे. ही तीन जेट पॅचर मशीन घेतल्यानंतर वर्षभरातच तीनही मशीन मेन्टेनन्सला काढली. तीन मशीन प्रत्येकी 72 लाख रुपयाला विकत घेतली. त्याच्या मेन्टेनन्सवर खर्च किती? 68 कोटी रुपये!!
थक्क झालात ना? 68 कोटी रुपयांत आणखी किती नवीन मशीन आल्या असत्या त्याचा हिशेब करायला लागलात? आम्हाला आधी हा आकडाच चुकीचा वाटला. पण माहिती देणाऱ्याने दोनदोनदा ठामपणे सांगितले की, 68 कोटी रुपये मेन्टेनन्ससाठी पालिकेने दिलेही आहेत. आम्ही म्हटले, 68 लाख असतील. पण नाही! 68 कोटीच मेन्टेनन्सवर खर्च केले आहेत.
कमी रकमेच्या निविदांचा घोळ
खड्डे बुजविण्यात इतका भ्रष्टाचार तर रस्ते बांधणीत किती असेल याचा विचार करा. खड्डे बुजविण्यासाठी किती खर्च येईल, याचा अंदाज पालिका अभियंता काढतो. त्यांनी काढलेल्या अंदाजावरून निविदेची किमान रक्कम ठरते. पालिकेचा अभियंता रक्कम निश्चित करतो म्हणजे ती योग्यच असते. पण कंत्राटदार त्यापेक्षा कमी किंमतीत निविदा भरतात. या कमी किंमतीत चांगल्या दर्जाचे काम कसे होऊ शकते हे न विचारता किमान रक्कमेपेक्षाही कमी रक्कमेची निविदा भरणाऱ्या कंत्राटदाराला काम देतात. यासाठी कंत्राटदार संपूर्ण कामाच्या 20 टक्के रक्कम वाटतो. मग काही काळाने हाच कंत्राटदार वाढीव रक्कम दाखवित खर्चाचा सुधारित अंदाज (एस्टीमेट रिव्हाईज) भरतो. ही वाढीव रक्कम लगेच मंजूर होते. म्हणजे कंत्राटदाराला काहीच तोटा होत नाही.
त्यानंतर कंत्राटदाराची कमाई सुरू होते. कंत्राटदार आणि पालिकेतील भ्रष्टाचारी या कमाईला अऊ आयटम (म्हणजे वेड्यातील येडी) असे म्हणतात. रस्ता करायचा असेल तर तो मजबूत करायला चार थर टाकावे लागतात. कंत्राटदार चार थर टाकण्याऐवजी दोनच थर टाकतो. एकदा रस्ता झाला की, किती थर टाकले ते सांगता येत नाही. त्यामुळे दोन थर टाकायचे, चार थराचे बिल लावायचे आणि न टाकलेल्या दोन थराचे पैसे थेट खिशात घालायचे. असे हे चार थरांचे खोटे बिल देताना "ये एडी आयटम है' असे म्हणतात.
मनसेचे रस्ते व आस्थापना विभागाचे प्रमुख संघटक योगेश परुळेकर आणि सरचिटणीस गौरव वालावलकर यांनी माहिती अधिकाराखाली ही सर्व भयानक व्यूहरचना खणून काढली. पत्रकार कीर्तीकुमार शिंदे यांनी प्रकाश टाकला आणि आज पालिका कंत्राटदारांचे कारस्थान "नवाकाळ' वाचकांसमोर मांडत आहे. भ्रष्टाचाराच्या कीडीने सर्व पोखरले गेले आहे हेच धगधगते सत्य आहे.
1867 साली रखमाबाईचे काय झाले?
गंगाधर गाडगीळ लिखित "मन्वंतर'मधील हा अभूतपूर्व खटला
मुंबईत दादाजीविरुध्द रखमाबाई प्रकरण उभं राहिलं. 1867 साली जनार्दन पांडुरंग नावाचा मनुष्य मरण पावला. त्याला फक्त रखमा नावाची एक मुलगी होती. त्याची एकंदर स्थावर आणि जंगम मिळकत पंचवीस हजारांची होती. त्याच्यामागे त्याची विधवा बायको होती. तिनं मुंबईतले तेव्हाचे एक प्रसिध्द डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांच्या जातीत अशा पुनर्विवाहास बंदी नव्हती. पण त्यावेळच्या कायद्याप्रमाणे त्या बाईचा आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मालमत्तेवरील अधिकार नष्ट झाला आणि जनार्दन पांडुरंगची सर्व मिळकत त्याची मुलगी रखमा हिच्या नावावर झाली.
या रखमाचं लग्न तिच्या तेराव्या वर्षी दादाजी नामक तरुणाशी झालं हा दादाजी डॉ. सखाराम अर्जुन यांचा जवळचा नातलग होता. तो घरचा गरीब होता आणि डॉ. सखाराम त्याला पोसत असत. त्याचं शिक्षणही बेताचं होतं आणि त्याला क्षयरोगाची भावना होती. पण त्यातून तो कसाबसा वाचला. पण पुढे हा दादाजी आणि डॉ. सखाराम यांचं पटेना.
रखमाबाई डॉ. सखाराम यांच्याकडेच आपल्या आईबरोबर राहत होती आणि फावल्या वेळात आर्य महिला समाजाची चिटणीस म्हणून काम करीत होती.
दादाजी असा सारखा प्रयत्न करीत होता की, रखमाबाईनं आपल्या घरी यावं आणि आपल्याबरोबर नांदावं. पण ती त्याच्याकडे जायला तयार नव्हती. इतक्यात डॉक्टर सखाराम अर्जुन वारले आणि दादाजीनं आपली बायको आपल्या ताब्यात मिळावी म्हणून हायकोर्टात 12 मार्च 1884 रोजी फिर्याद केली. तेव्हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला दादाजीच्या ताब्यात दिलं जाण्याचा संभव आहे हे रखमाबाईच्या ध्यानात आलं.
तेव्हा रखमाबाईनं मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रांत एक पत्र प्रसिध्द करून आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे, असं आपलं दुःख जाहीर केलं. यात तिचा हेतू असा होता की, आपल्याला सुधारकांची सहानुभूती मिळावी आणि हायकोर्टावर वजन पडावं. आपण जबरदस्तीनं एका स्त्रीला तिच्या पतीबरोबर नांदायला लावत आहोत, ज्याच्याशी तिचा विवाह तिच्या संमतीशिवाय झाला, त्याच्याबरोबर पत्नी म्हणून नांदायला भाग पाडत आहोत, असं एकदा हायकोर्टाच्या ध्यानात आलं, की न्यायदान करताना असा अन्याय आपल्या हातून होऊ नये, असं न्यायमूर्तींना साहजिकच वाटेल, असा हेतू त्यामागे होता.
आणि हाच खटल्यात मुख्य मुद्दा होता. रखमाबाईनं दादाजीशी लग्न झालं होतं, ते काही तिच्या संमतीनं झालं नव्हतं आणि म्हणून न्यायदानाच्या नावाखाली न्यायालयात तिला सक्तीनं दादाजीची बायको म्हणून नांदायला भाग पाडू नयं.
या मुद्द्यावर हिंदू धर्मशास्त्रावर आधारलेल्या कायद्यात काहीच स्थान नव्हतं. पण न्यायबुध्दीला ते पटणारं नव्हतं. म्हणून न्यायमूर्ती पिन्हे यांनी 21 सप्टेंबर 1886 रोजी रखमाबाईच्या बाजूनं निकाल दिला.
या निकालावर दादाजीनं हायकोर्टात अपील केलं. तेव्हा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सार्जंट आणि न्यायमूर्ती वेले यांनी पिन्हेसाहेबांचा निकाल फिरवला. हायकोर्टाचं म्हणणं असं होतं की, कायदा नैतिकदृष्ट्या न्याय करणारा आहे की नाही हे जर कोर्ट ठरवू लागलं तर ते कायदेमंडळाची जागा घेईल आणि ते इष्ट होणार नाही. शिवाय या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका घेणं अगदी शक्य आहे. म्हणजे एका कोर्टात एक न्याय मिळेल, तर दुसऱ्या कोर्टात वेगळाच निर्णय दिला जाण्याची शक्यता निर्माण होईल. न्यायदानात अनिश्चितता येईल. गोंधळ उडेल. तेव्हा न्याय काय आणि अन्याय काय, ते ठरविण्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर न घेता कोर्टानं कायद्याची अंमलबजावणी हेच आपलं कार्य आहे, असं मानलं. आणि म्हणून हायकोर्टानं दादाजीचा त्याच्या बायकोवरील हक्क मान्य केला.
तेव्हा रखमाबाईनं जाहीर केलं, की मी नवऱ्याच्या घरी बायको म्हणून नांदायला जाणार नाही. त्यामुळे मला तुरुंगात जायला लागलं, तर तिथे जायला मी तयार आहे.
गोष्टी जाहीररित्या इतक्या थराल्या गेल्यावर एलफिन्स्टन कॉलेजचे प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी रखमाबाई डिफेन्स कमिटी स्थापन केली. त्यांना सुधारकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हा खटला तसा राज्यकारभाराच्या दृष्टीनं महत्त्वाचा नसला, तरी विशेषच गाजला.
ह्या खटल्याच्या मुळाशी जो मूलभूत मुद्दा होता तो म्हणजे हिंदू स्त्रियांची स्थिती त्यांना स्वतःच्या जीवनाबाबतचे मूलभूत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाहीत, की त्यांना पुरुषांच्या गुलामगिरीत जगावं लागतं आहे?
या खटल्याची बातमी इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचली. पुष्कळसं स्वातंत्र्य भोगणाऱ्या आणि अधिक स्वातंत्र्य व हक्क मिळावे म्हणून चळवळ करणाऱ्या इंग्लिश बायका हिंदू स्त्रियांविषयी सहानुभूती दाखवून रखमाबाई कशी आहे, त्याची विचारपूस करू लागल्या.
हायकोर्टानं दादाजीच्या बाजूनं जरी निकाल दिला, तरी ते प्रकरण पुढे लढवायला लागणारा पैसा त्या बापड्याकडे नव्हता म्हणून रखमाबाईचा ताबा मिळवणे किंवा तिला तुरुंगात पाठवण्याची कारवाई करणे त्याला शक्य झाले नाही.
रखमाबाईच्या बाजूनं त्याच्याशी सामोपचाराची बोलणी झाली. त्याला चरितार्थासाठी पैसे देण्यात आले आणि त्यानं आपला नवरेपणाचा हक्क बजावण्याचा आग्रह सोडून दिला. रखमाबाईंना कोर्टाचा हुकूम मोडल्याबद्दल त्या दिवशी कोर्ट उठेपर्यंत नाममात्र शिक्षा झाली. न्यायक्रियेच्या कचाट्यातून ती सुटली. पण नंतर तिच्या जातीनं तिच्यावर बहिष्कार टाकला.
पण तिला आधार देणारी मंडळीही पुष्कळ होती. त्यात प्रिन्सिपल वर्डस्वर्य होते. त्यांनी तिला सावरलं आणि नंतर ती पुढे डॉक्टरीच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेली. तिनं तिथे एम.डी.ची डिग्री मिळवली आणि परतून यशस्वीपणे डॉक्टरीचा व्यवसाय केला. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षी 1955 साली तिचं निधन झालं. तिनं जणू स्त्रीस्वातंत्र्याच्या मुंबई इलाख्यातील व भारतातील चळवळीचा पाया घातला.
मुंबईत दादाजीविरुध्द रखमाबाई प्रकरण उभं राहिलं. 1867 साली जनार्दन पांडुरंग नावाचा मनुष्य मरण पावला. त्याला फक्त रखमा नावाची एक मुलगी होती. त्याची एकंदर स्थावर आणि जंगम मिळकत पंचवीस हजारांची होती. त्याच्यामागे त्याची विधवा बायको होती. तिनं मुंबईतले तेव्हाचे एक प्रसिध्द डॉक्टर सखाराम अर्जुन यांच्याशी पुनर्विवाह केला. त्यांच्या जातीत अशा पुनर्विवाहास बंदी नव्हती. पण त्यावेळच्या कायद्याप्रमाणे त्या बाईचा आपल्या पहिल्या नवऱ्याच्या मालमत्तेवरील अधिकार नष्ट झाला आणि जनार्दन पांडुरंगची सर्व मिळकत त्याची मुलगी रखमा हिच्या नावावर झाली.
या रखमाचं लग्न तिच्या तेराव्या वर्षी दादाजी नामक तरुणाशी झालं हा दादाजी डॉ. सखाराम अर्जुन यांचा जवळचा नातलग होता. तो घरचा गरीब होता आणि डॉ. सखाराम त्याला पोसत असत. त्याचं शिक्षणही बेताचं होतं आणि त्याला क्षयरोगाची भावना होती. पण त्यातून तो कसाबसा वाचला. पण पुढे हा दादाजी आणि डॉ. सखाराम यांचं पटेना.
रखमाबाई डॉ. सखाराम यांच्याकडेच आपल्या आईबरोबर राहत होती आणि फावल्या वेळात आर्य महिला समाजाची चिटणीस म्हणून काम करीत होती.
दादाजी असा सारखा प्रयत्न करीत होता की, रखमाबाईनं आपल्या घरी यावं आणि आपल्याबरोबर नांदावं. पण ती त्याच्याकडे जायला तयार नव्हती. इतक्यात डॉक्टर सखाराम अर्जुन वारले आणि दादाजीनं आपली बायको आपल्या ताब्यात मिळावी म्हणून हायकोर्टात 12 मार्च 1884 रोजी फिर्याद केली. तेव्हा हिंदू धर्मशास्त्राप्रमाणे आपल्याला दादाजीच्या ताब्यात दिलं जाण्याचा संभव आहे हे रखमाबाईच्या ध्यानात आलं.
तेव्हा रखमाबाईनं मुंबईच्या इंग्रजी वृत्तपत्रांत एक पत्र प्रसिध्द करून आपल्यावर जबरदस्ती केली जात आहे, असं आपलं दुःख जाहीर केलं. यात तिचा हेतू असा होता की, आपल्याला सुधारकांची सहानुभूती मिळावी आणि हायकोर्टावर वजन पडावं. आपण जबरदस्तीनं एका स्त्रीला तिच्या पतीबरोबर नांदायला लावत आहोत, ज्याच्याशी तिचा विवाह तिच्या संमतीशिवाय झाला, त्याच्याबरोबर पत्नी म्हणून नांदायला भाग पाडत आहोत, असं एकदा हायकोर्टाच्या ध्यानात आलं, की न्यायदान करताना असा अन्याय आपल्या हातून होऊ नये, असं न्यायमूर्तींना साहजिकच वाटेल, असा हेतू त्यामागे होता.
आणि हाच खटल्यात मुख्य मुद्दा होता. रखमाबाईनं दादाजीशी लग्न झालं होतं, ते काही तिच्या संमतीनं झालं नव्हतं आणि म्हणून न्यायदानाच्या नावाखाली न्यायालयात तिला सक्तीनं दादाजीची बायको म्हणून नांदायला भाग पाडू नयं.
या मुद्द्यावर हिंदू धर्मशास्त्रावर आधारलेल्या कायद्यात काहीच स्थान नव्हतं. पण न्यायबुध्दीला ते पटणारं नव्हतं. म्हणून न्यायमूर्ती पिन्हे यांनी 21 सप्टेंबर 1886 रोजी रखमाबाईच्या बाजूनं निकाल दिला.
या निकालावर दादाजीनं हायकोर्टात अपील केलं. तेव्हा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश सार्जंट आणि न्यायमूर्ती वेले यांनी पिन्हेसाहेबांचा निकाल फिरवला. हायकोर्टाचं म्हणणं असं होतं की, कायदा नैतिकदृष्ट्या न्याय करणारा आहे की नाही हे जर कोर्ट ठरवू लागलं तर ते कायदेमंडळाची जागा घेईल आणि ते इष्ट होणार नाही. शिवाय या बाबतीत वेगवेगळ्या भूमिका घेणं अगदी शक्य आहे. म्हणजे एका कोर्टात एक न्याय मिळेल, तर दुसऱ्या कोर्टात वेगळाच निर्णय दिला जाण्याची शक्यता निर्माण होईल. न्यायदानात अनिश्चितता येईल. गोंधळ उडेल. तेव्हा न्याय काय आणि अन्याय काय, ते ठरविण्याची जबाबदारी आपल्या माथ्यावर न घेता कोर्टानं कायद्याची अंमलबजावणी हेच आपलं कार्य आहे, असं मानलं. आणि म्हणून हायकोर्टानं दादाजीचा त्याच्या बायकोवरील हक्क मान्य केला.
तेव्हा रखमाबाईनं जाहीर केलं, की मी नवऱ्याच्या घरी बायको म्हणून नांदायला जाणार नाही. त्यामुळे मला तुरुंगात जायला लागलं, तर तिथे जायला मी तयार आहे.
गोष्टी जाहीररित्या इतक्या थराल्या गेल्यावर एलफिन्स्टन कॉलेजचे प्रिन्सिपल वर्डस्वर्थ यांनी रखमाबाई डिफेन्स कमिटी स्थापन केली. त्यांना सुधारकांचा पाठिंबा मिळाला. त्यामुळे हा खटला तसा राज्यकारभाराच्या दृष्टीनं महत्त्वाचा नसला, तरी विशेषच गाजला.
ह्या खटल्याच्या मुळाशी जो मूलभूत मुद्दा होता तो म्हणजे हिंदू स्त्रियांची स्थिती त्यांना स्वतःच्या जीवनाबाबतचे मूलभूत निर्णय घेण्याचे अधिकार आहेत की नाहीत, की त्यांना पुरुषांच्या गुलामगिरीत जगावं लागतं आहे?
या खटल्याची बातमी इंग्लंडमध्ये जाऊन पोहोचली. पुष्कळसं स्वातंत्र्य भोगणाऱ्या आणि अधिक स्वातंत्र्य व हक्क मिळावे म्हणून चळवळ करणाऱ्या इंग्लिश बायका हिंदू स्त्रियांविषयी सहानुभूती दाखवून रखमाबाई कशी आहे, त्याची विचारपूस करू लागल्या.
हायकोर्टानं दादाजीच्या बाजूनं जरी निकाल दिला, तरी ते प्रकरण पुढे लढवायला लागणारा पैसा त्या बापड्याकडे नव्हता म्हणून रखमाबाईचा ताबा मिळवणे किंवा तिला तुरुंगात पाठवण्याची कारवाई करणे त्याला शक्य झाले नाही.
रखमाबाईच्या बाजूनं त्याच्याशी सामोपचाराची बोलणी झाली. त्याला चरितार्थासाठी पैसे देण्यात आले आणि त्यानं आपला नवरेपणाचा हक्क बजावण्याचा आग्रह सोडून दिला. रखमाबाईंना कोर्टाचा हुकूम मोडल्याबद्दल त्या दिवशी कोर्ट उठेपर्यंत नाममात्र शिक्षा झाली. न्यायक्रियेच्या कचाट्यातून ती सुटली. पण नंतर तिच्या जातीनं तिच्यावर बहिष्कार टाकला.
पण तिला आधार देणारी मंडळीही पुष्कळ होती. त्यात प्रिन्सिपल वर्डस्वर्य होते. त्यांनी तिला सावरलं आणि नंतर ती पुढे डॉक्टरीच्या अभ्यासासाठी इंग्लंडला गेली. तिनं तिथे एम.डी.ची डिग्री मिळवली आणि परतून यशस्वीपणे डॉक्टरीचा व्यवसाय केला. वयाच्या एक्याण्णवाव्या वर्षी 1955 साली तिचं निधन झालं. तिनं जणू स्त्रीस्वातंत्र्याच्या मुंबई इलाख्यातील व भारतातील चळवळीचा पाया घातला.
Sunday, August 1, 2010
फिल्मी कलाकारांचे ऐका! आरोग्य राखा!
(सुवर्णकण)
रायमा सेन
रोज प्रथम सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कारामुळे रक्तभिसरण चांगले होते. सूर्यनमस्कार हा सर्वांगासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी भाज्यांचा रस पिते. न्याहारीला गव्हाचा ब्रेड, फळांचा रस, अंड्याचा पिवळा बलक काढून केलेले आम्लेट असा परिपूर्ण आहार असतो. रोज तोच तोच व्यायाम केला तर कंटाळा येतो. त्यामुळे सतत व्यायाम बदलत राहा. ज्या गोष्टी आपल्याला खायला आवडत नाहीत त्या सर्वात शेवटी म्हणजे रात्रीच्या भोजनासाठी राखून ठेवा. फळ, कच्च्या पालेभाज्या हे रात्री घ्यावं. आरोग्य राखायचे म्हणजे अती व्यायाम करून शरीराला दुखापत करून घेणे नव्हे. आपल्या मर्यादा ओळखून व्यायाम करावा, हे महत्त्वाचे आहे.
कंगना राणावत
मी भरपूर पाणी पिते. दिवसांत 8 ग्लास पाणी प्यायल्याने माझी त्वचा तुकतुकीत राहते. मी व्यायाम करून आधीच शरीर कमावल्याने मला आता खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. जीममध्ये मी आठवड्यातून फक्त काहीच दिवस जाते. मात्र रोज ध्यानधारणा आणि योग करणे मी चूकवत नाही. माझे शरीर उत्तम राहण्याचे कारण योग हेच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रोजची किमान आठ तास झोप झालीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नसेल तर प्रकृती चांगली राहूच शकत नाही.
इशा कोपीकर
शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार आणि आवश्यक तितकी झोप या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी रोज कटाक्षाने आठ तासांची झोप घेते. ही झोप सलग नसली तरी अधूनमधून झोप काढायची. त्याचबरोबर रोज उठल्या उठल्या 1 लीटर पाणीही पिते. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर फेकले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही भूकेले राहू नका. भूकेले राहण्यापेक्षा दर दोन तासांची थोडेथोडे खात राहायचे. चांगली न्याहारी, दुपारचे चांगले जेवण आणि रात्री अगदी हलके भोजन यामध्ये कधी एखादे फळ, कपभर चहा आणि मारी बिस्कीट किंवा सुकामेवा हे माझे रोजचे खाणे असते.
मंदिरा बेदी
मी गोड अजिबात खात नाही. विशेषतः चॉकलेट खात नाही. कारण चॉकलेटचा एक खास खायला गेले की अख्खे चॉकलेट खाल्ले जाते. कार्बोहायड्रेट किती घेता यावर नियंत्रण ठेवायला हवे. मात्र कार्बोहायड्रेटची ही गरज आहे हे लक्षात ठेवा. तीन दिवसांतून एकदा कार्बोहायड्रेट घ्यायला हवे. मी आठवड्यातील 5 दिवस रोज 40 मिनिटे व्यायाम करते. मी शाकाहारी असल्याने शरीरात प्रोटीन कमी जाते. यासाठी अंड्याचा पांढरा भाग आम्लेट करून खावा. त्याचबरोबर मोड आलेली कडधान्ये आणि सोयाचेही सेवन करावे. कोणत्याही परिस्थितीत भूकेले राहू नये. ठरलेल्या अंतराने थोडे थोडे अन्न पोटात गेले पाहिजे. यामध्ये जर भूक लागली तर एखादे बिस्कीट, सॅण्डविच व फळ खाणे उत्तम.
रोनित रॉय :
मी कधीही अती खात नाही आणि घरचे अन्नच खातो. मी शाकाहारी आहे. माझ्या भोजनात विविध धान्यांचा समावेश अधिक असतो. बाजरीची भाकरी आवश्यक असते. गहू आणि तांदूळ मी अजिबात खात नाही. मी ब्रेड, बिस्किट, समोसाही कधी खात नाही. नित्यनियमाने रोज 1 तास धावण्याचा व्यायाम करतो.
राहूल देव
आपले वय वाढत जाते तसतशी आपली श्वसनाची शक्ती कमी होते. यासाठी नेहमी दीर्घ श्वास घेऊन सोडणे महत्त्वाचे असते. याची स्वतःला सवय करून घ्यावी लागते. रोज ठराविक लीटर पाणी पिणे महत्त्वाचे नसून दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रोजचा 40 मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी जीमलाच जाणे गरजेचे नाही. चालणे, धावणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळणे यापैकी कुठलाही व्यायाम केला तरी चालेल. दिवसभर 5 ते 6 वेळा थोडेथोडे खावे. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही आवश्यक आहे. प्रोटीनने स्नायू तयार होतात आणि कार्ब्रोहायड्रेट मेंदूसाठी आवश्यक असते.
रायमा सेन
रोज प्रथम सूर्यनमस्कार घालते. सूर्यनमस्कारामुळे रक्तभिसरण चांगले होते. सूर्यनमस्कार हा सर्वांगासाठी सर्वात उत्तम व्यायाम आहे. सूर्यनमस्कार झाल्यानंतर मी भाज्यांचा रस पिते. न्याहारीला गव्हाचा ब्रेड, फळांचा रस, अंड्याचा पिवळा बलक काढून केलेले आम्लेट असा परिपूर्ण आहार असतो. रोज तोच तोच व्यायाम केला तर कंटाळा येतो. त्यामुळे सतत व्यायाम बदलत राहा. ज्या गोष्टी आपल्याला खायला आवडत नाहीत त्या सर्वात शेवटी म्हणजे रात्रीच्या भोजनासाठी राखून ठेवा. फळ, कच्च्या पालेभाज्या हे रात्री घ्यावं. आरोग्य राखायचे म्हणजे अती व्यायाम करून शरीराला दुखापत करून घेणे नव्हे. आपल्या मर्यादा ओळखून व्यायाम करावा, हे महत्त्वाचे आहे.
कंगना राणावत
मी भरपूर पाणी पिते. दिवसांत 8 ग्लास पाणी प्यायल्याने माझी त्वचा तुकतुकीत राहते. मी व्यायाम करून आधीच शरीर कमावल्याने मला आता खूप कष्ट घ्यावे लागत नाहीत. जीममध्ये मी आठवड्यातून फक्त काहीच दिवस जाते. मात्र रोज ध्यानधारणा आणि योग करणे मी चूकवत नाही. माझे शरीर उत्तम राहण्याचे कारण योग हेच आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोणत्याही परिस्थितीत रोजची किमान आठ तास झोप झालीच पाहिजे. झोप पूर्ण झाली नसेल तर प्रकृती चांगली राहूच शकत नाही.
इशा कोपीकर
शरीराचे आरोग्य राखण्यासाठी योग्य आहार आणि आवश्यक तितकी झोप या दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी रोज कटाक्षाने आठ तासांची झोप घेते. ही झोप सलग नसली तरी अधूनमधून झोप काढायची. त्याचबरोबर रोज उठल्या उठल्या 1 लीटर पाणीही पिते. यामुळे शरीरातील टॉक्सीन बाहेर फेकले जातात. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे कधीही भूकेले राहू नका. भूकेले राहण्यापेक्षा दर दोन तासांची थोडेथोडे खात राहायचे. चांगली न्याहारी, दुपारचे चांगले जेवण आणि रात्री अगदी हलके भोजन यामध्ये कधी एखादे फळ, कपभर चहा आणि मारी बिस्कीट किंवा सुकामेवा हे माझे रोजचे खाणे असते.
मंदिरा बेदी
मी गोड अजिबात खात नाही. विशेषतः चॉकलेट खात नाही. कारण चॉकलेटचा एक खास खायला गेले की अख्खे चॉकलेट खाल्ले जाते. कार्बोहायड्रेट किती घेता यावर नियंत्रण ठेवायला हवे. मात्र कार्बोहायड्रेटची ही गरज आहे हे लक्षात ठेवा. तीन दिवसांतून एकदा कार्बोहायड्रेट घ्यायला हवे. मी आठवड्यातील 5 दिवस रोज 40 मिनिटे व्यायाम करते. मी शाकाहारी असल्याने शरीरात प्रोटीन कमी जाते. यासाठी अंड्याचा पांढरा भाग आम्लेट करून खावा. त्याचबरोबर मोड आलेली कडधान्ये आणि सोयाचेही सेवन करावे. कोणत्याही परिस्थितीत भूकेले राहू नये. ठरलेल्या अंतराने थोडे थोडे अन्न पोटात गेले पाहिजे. यामध्ये जर भूक लागली तर एखादे बिस्कीट, सॅण्डविच व फळ खाणे उत्तम.
रोनित रॉय :
मी कधीही अती खात नाही आणि घरचे अन्नच खातो. मी शाकाहारी आहे. माझ्या भोजनात विविध धान्यांचा समावेश अधिक असतो. बाजरीची भाकरी आवश्यक असते. गहू आणि तांदूळ मी अजिबात खात नाही. मी ब्रेड, बिस्किट, समोसाही कधी खात नाही. नित्यनियमाने रोज 1 तास धावण्याचा व्यायाम करतो.
राहूल देव
आपले वय वाढत जाते तसतशी आपली श्वसनाची शक्ती कमी होते. यासाठी नेहमी दीर्घ श्वास घेऊन सोडणे महत्त्वाचे असते. याची स्वतःला सवय करून घ्यावी लागते. रोज ठराविक लीटर पाणी पिणे महत्त्वाचे नसून दिवसभर थोडे थोडे पाणी पित राहणे महत्त्वाचे आहे. त्याचबरोबर रोजचा 40 मिनिटे व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी जीमलाच जाणे गरजेचे नाही. चालणे, धावणे, पोहणे किंवा तुमचा आवडता खेळ खेळणे यापैकी कुठलाही व्यायाम केला तरी चालेल. दिवसभर 5 ते 6 वेळा थोडेथोडे खावे. कार्बोहायड्रेट आणि प्रोटीन दोन्ही आवश्यक आहे. प्रोटीनने स्नायू तयार होतात आणि कार्ब्रोहायड्रेट मेंदूसाठी आवश्यक असते.
Saturday, July 24, 2010
बाभळीचा वाद!
(सुवर्णकण)
आंध्र प्रदेश 1975 सालचा करार मोडत आहे!
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. हा बंधारा बांधण्याचे काम त्वरीत थांबवावे यासाठी आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत आहे हे स्पष्टच आहे. गोदावरी नदीवर जर बाभळी बंधारा बांधला तर आंध्रच्या तेलंगणा भागातील किमान सहा जिल्ह्यांना पाणी मिळणार नाही. यामुळे आधीच दुष्काळात ओढलेले हे जिल्हे पाण्याअभावी उद्ध्वस्त होतील, असा आंध्रचा दावा आहे. याच तेलंगणा भागात येत्या दहा दिवसांत स्थानिक निवडणुका आहेत. या निवडणुकांवर नजर ठेवून आंदोलन सुरू झाले आहे.
1975 साली आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसारच गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. या बंधाऱ्याची क्षमता केवळ पावणेतीन टीएमसी पाण्याची असल्याचे महाराष्ट्र शासनाचे म्हणणे आहे. येथील 58 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 26 एप्रिल 2007 रोजी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्या. के.जी. बालकृष्णन्, न्या. आर. व्ही रवींद्रन आणि न्या. डी. के. जैन यांच्या खंडपीठाने हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला परवानगी दिली. फक्त पाणी सोडण्यासाठी बंधाऱ्यावर गेट बांधू नये अशी अट घातली. सर्वोच्च न्यायालयाने बंधारा बांधण्यास परवानगी दिल्यानंतरही आंध्र प्रदेशातून या धरणाला सतत विरोध होत आहे.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, गोदावरी नदीवर महाराष्ट्राने 13 लहान मोठे प्रकल्प बांधले तर आंध्र प्रदेशला पाणीच मिळणार नाही. आंध्र प्रदेशच्या श्री राम संग्राम योजनेला अर्थच उरणार नाही. तेलंगणा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पोचंबड धरणात पाणी भरणारच नाही. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस. आर. रेड्डी यांनीही या बंधाऱ्याला विरोध केला होता. हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पक्षाच्या लोकसभेतील चार खासदारांनी संसदेत धुमाकूळ घालून अधिवेशन बंद पाडले होते.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, दोन्ही राज्यांत झालेल्या करारानुसार महाराष्ट्राला फक्त 65 टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी आहे. महाराष्ट्राने याआधीच दुधना (14 टीएमसी), मुजलगब (12.4 टीएमसी), मंजिरा (11.2 टीएमसी) आणि विष्णुपुरी (11.4 टीएमसी) अशा चार योजना करून महाराष्ट्राच्या वाटणीचे सर्व 65 टीएमसी पाणी उपसले आहे. त्यामुळे आता हा बंधारा बांधून आणखी पाणी घेता येणार नाही. बाभळी बंधारा बांधला तर आंध्रने गोदावरी नदीवर उभारलेल्या श्री रामसागर योजनेतही पाणी येणार नाही.
आंध्र प्रदेशचे हे आरोप असत्य आहेत, असे महाराष्ट्राचे वकील अन्धियार्जुना यांनी सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिले. यामुळे न्यायालयाने बंधारा बांधण्याची महाराष्ट्राला परवानगी दिली. तरीही स्वतःचे राजकीय हित जपण्यासाठी आंध्रचे राजकारणी याबाबत अजूनही आंदोलने करीत आहेत.
आंध्र प्रदेश 1975 सालचा करार मोडत आहे!
नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. हा बंधारा बांधण्याचे काम त्वरीत थांबवावे यासाठी आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पार्टीचे नेते आणि माजी मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी आंदोलन सुरू केले आहे. हे आंदोलन राजकीय हेतूने प्रेरीत आहे हे स्पष्टच आहे. गोदावरी नदीवर जर बाभळी बंधारा बांधला तर आंध्रच्या तेलंगणा भागातील किमान सहा जिल्ह्यांना पाणी मिळणार नाही. यामुळे आधीच दुष्काळात ओढलेले हे जिल्हे पाण्याअभावी उद्ध्वस्त होतील, असा आंध्रचा दावा आहे. याच तेलंगणा भागात येत्या दहा दिवसांत स्थानिक निवडणुका आहेत. या निवडणुकांवर नजर ठेवून आंदोलन सुरू झाले आहे.
1975 साली आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्र यांच्यात पाणीवाटपाचा करार झाला. या करारानुसारच गोदावरी नदीवर बाभळी बंधारा बांधला जात आहे. या बंधाऱ्याची क्षमता केवळ पावणेतीन टीएमसी पाण्याची असल्याचे महाराष्ट्र शासनाचे म्हणणे आहे. येथील 58 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सुटणार आहे. 26 एप्रिल 2007 रोजी गुरुवारी सर्वोच्च न्यायालयाचे प्रमुख न्या. के.जी. बालकृष्णन्, न्या. आर. व्ही रवींद्रन आणि न्या. डी. के. जैन यांच्या खंडपीठाने हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला परवानगी दिली. फक्त पाणी सोडण्यासाठी बंधाऱ्यावर गेट बांधू नये अशी अट घातली. सर्वोच्च न्यायालयाने बंधारा बांधण्यास परवानगी दिल्यानंतरही आंध्र प्रदेशातून या धरणाला सतत विरोध होत आहे.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, गोदावरी नदीवर महाराष्ट्राने 13 लहान मोठे प्रकल्प बांधले तर आंध्र प्रदेशला पाणीच मिळणार नाही. आंध्र प्रदेशच्या श्री राम संग्राम योजनेला अर्थच उरणार नाही. तेलंगणा भागाला पाणीपुरवठा करणाऱ्या पोचंबड धरणात पाणी भरणारच नाही. आंध्र प्रदेशचे दिवंगत मुख्यमंत्री वाय एस. आर. रेड्डी यांनीही या बंधाऱ्याला विरोध केला होता. हा बंधारा बांधण्यास महाराष्ट्राला सर्वोच्च न्यायालयाने परवानगी दिल्यावर आंध्र प्रदेशच्या तेलगू देसम पक्षाच्या लोकसभेतील चार खासदारांनी संसदेत धुमाकूळ घालून अधिवेशन बंद पाडले होते.
आंध्र प्रदेशचे म्हणणे आहे की, दोन्ही राज्यांत झालेल्या करारानुसार महाराष्ट्राला फक्त 65 टीएमसी पाणी उचलण्यास परवानगी आहे. महाराष्ट्राने याआधीच दुधना (14 टीएमसी), मुजलगब (12.4 टीएमसी), मंजिरा (11.2 टीएमसी) आणि विष्णुपुरी (11.4 टीएमसी) अशा चार योजना करून महाराष्ट्राच्या वाटणीचे सर्व 65 टीएमसी पाणी उपसले आहे. त्यामुळे आता हा बंधारा बांधून आणखी पाणी घेता येणार नाही. बाभळी बंधारा बांधला तर आंध्रने गोदावरी नदीवर उभारलेल्या श्री रामसागर योजनेतही पाणी येणार नाही.
आंध्र प्रदेशचे हे आरोप असत्य आहेत, असे महाराष्ट्राचे वकील अन्धियार्जुना यांनी सर्वोच्च न्यायालयाला पटवून दिले. यामुळे न्यायालयाने बंधारा बांधण्याची महाराष्ट्राला परवानगी दिली. तरीही स्वतःचे राजकीय हित जपण्यासाठी आंध्रचे राजकारणी याबाबत अजूनही आंदोलने करीत आहेत.
Saturday, July 10, 2010
जेसी ओवेन्स काळे तुफान
(सुवर्णकण)
द्वारकानाथ संझगिरी यांच्या "चॅम्पियन्स महान खेळाडूंची गौरवगाथा' या पुस्तकात क्रीडा विश्वातील विविध खेळातील चॅम्पियन्सची यशोगाथा त्यांनी रेखाटली आहे. त्यात 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये जगातील सर्वाधिक वेगवान माणूस ठरणारा जे. सी. ऑपन्स याच्या बद्दलचा लेखसुद्धा द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिला आहे. त्याच लेखातील हा उतारा.
तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं! त्यानंतर तो तिथे फिरकलाच नाही. पण त्याच्या त्या पराक्रमाची पुण्याई एवढी मोठी होती की, त्यानंतर तो अजरामर झाला. ही कथा आहे जेसी क्लेव्हेलॅन्ड ओवेन्स नावाच्या खेळाडूची ऑलिम्पिकमध्ये शेकडो खेळाडू भाग घेत असतात. पण एखादा खेळाडू क्रीडा कौशल्याची एवढी उच्च पातळी गाठतो की तो संपूर्ण ऑलिम्पिक्स खाऊन टाकतो.
36 चं बर्लिन ऑलिम्पिक्स हे जेसी ओवेन्सच्या पायाशी निगडीत आहे. त्या ऑलिम्पिक्समध्ये त्याने चार सुवर्णपदकांवर आपला हक्क प्रस्थापपित केला. पण केवळ तेवढ्या भांडवलावर तो "दंतकथेत' जमा झाला नाही. जगातील लाखो लोकांच्या आणि विशेषः कृष्णवर्णियांच्या गळ्यातला तो ताईत बनला, त्याने हिटलरच्या वंशश्रेष्ठत्त्वाच्या तत्त्वज्ञानाच्या ठिकऱ्या उडवल्या म्हणून! ओवेन्स-हिटलर हे प्रकरण त्यावर्षी बरंच गाजलं. जर्मन आणि फक्त गोऱ्या त्वचेच्या खेळाडूंना त्याच्या खोलीत बोलावून त्यांच अभिनंदन करणाऱ्या जर्मनीच्या हुकुमशहाने जेसी ओवेन्सचे राकट काळे हात हातात घेणं शेवटपर्यंत कटाक्षाने टाळलं. जसा हिटलर तशी त्याच्या कब्जात असलेली वर्तमानपत्रं! नाझी वर्तमानपत्रे तर निग्रोचं "ब्लॅक आक्झीलियरी' असंच वर्णन करायची.
राज्यकर्त्यांची जरी ही तऱ्हा असली तरी आम जर्मन जनतेने जेसी ओवेन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांचा आणि त्याच्या स्वाक्षरीसाठी धडपडणाऱ्यांचा त्याला इतका गराडा पडायला की सह्या करून त्याच्या हातांना त्रास होईल, म्हणून अमेरिकन टीम मॅनेजरने त्याला ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडू नकोस अशी विनंती केली. हुकुमशाहीच्या कोंदट वातावणरातही ओवेन्सचं महात्म्य वाढत गेलं.
विक्रमाची घाऊक मोडतोड
ओवेन्सने बर्लिनमध्ये पाय ठेवण्याअगोदर त्याच्या असामान्य क्रीडानिपुणतेची झलक दाखवलेली होती किंबहुना सात जागतिक विक्रमांचे तुरे डोक्यावर मिरवतच तो बर्लिनमध्ये अवतरला. 25 मे 1935 रोजी हमशीनगनमधल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत, घड्याळाचे काटे दुपारी सव्वातीनवरून चारपर्यंत पोहचायच्या आत त्याने सहा जागतिक विक्रम इतिहासजमा करून टाकले होते. मुख्य म्हणजे त्या ऐतिहासिक दिवशी ओवेन्स पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखी वगैरे सर्व विसरून त्याने ते अंतर 9.4 सेकंदांत पार केले. नंतर फक्त दहा मिनिटाने त्याने 8.13 मीटर्स लांब उडी मारली आणि तोही जागतिक विक्रम ओवेन्सच्या खिशाल अलगद जाऊन पडला. त्याने चक्क सहा इंचाने बाजी मारली होती. त्यानंतर जागतिक विक्रमांनासुद्धा ओवेन्सचा लळा लागला असावा. कारण काही मिनिटांतच 220 यार्डस, 200 मीटर्स हर्डल्स असे चार धावण्याचे जागतिक विक्रम ओवेन्सला जाऊन बिलगले. केवळ पंचेचाळीस मिनिटांत जेसी ओवेन्स सात जागतिक विक्रमांचा अधिपती झाला होता.
हे काळं तुफान असंच सहजतेने अंतिम फेरीपर्यंत सरकलं. दिनांक 3 ऑगस्टला अंतिम फेरीत पावसाने ओल्या झालेल्या ट्रॅकवर फ्रॅन्क व्हायकॉफ, रास्फ मेटकॉल्फ, रेनार्ट स्ट्रॅन्डबर्ग सारख्या मातब्बर धावपटूंना मागे सारत, जेसी ओवेन्सने 100 मीटर्सचं सुवर्णपदक एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या साक्षीने स्वतःच्या मालकीचं केलं. त्याने सर्व प्रेक्षकांना एवढं वेड लावलं होतं की, प्रेक्षकही मनाने ओवेन्सबरोबर धावत होते. तो जगातला सर्वात वेगवान मानव ठरला होता. ज्या नशिबवान डोळ्यांनी त्याला न्याहाळलं ते त्याच्या धावण्याच्या शैलीची तुलना एखाद्या सुंदर बॅले डान्सरशी करत होते. मुख्य म्हणजे ते ज्याला अत्यंत सहज जमत होतं. नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे कुठेही फार प्रयत्न ूकरावे लागतायत असा प्रकार नव्हता. 4 ऑगस्टचा दिवसही ओवेन्सच्याच नावावर लिहिला गेला होता. ओवेन्सने उंच उडीचं सुवर्णपदक त्या दिवशी जिंकलं. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची घटना तो दिवस अविस्मरणीय करून गेली. खऱ्याखुऱ्या ऑलिम्पिक स्पिरीटचा प्रत्यय त्या दिवशी आला. "लांब उडी' हे खरं तर जेसी ओवेन्सचं राखीव कुरण होतं. पण त्या दिवशी आश्चर्य घडलं. टेक ऑफ घेताना चूक झाल्यामुळे त्याच्या पहिल्या दोन्ही उड्या बाद ठरविण्यात आल्या. आता फक्त एकच संधी उरली होती. ती हुकली असती तर जगातील सर्वोत्कृष्ट लांब उडी मारणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक दूरच राहो, साधी अंतिम फेरीत भाग घ्यायचीसुद्धा संधी मिळाली नसती.
आलिम्पिक स्पिरीट
भांबावलेल्या ओवेन्सला काय चुकतंय हेच कळेना. ऐनवेळी "आर्यन' रक्ताच्या लॅक लॉंगने कानावर सतत पडणाऱ्या आर्यन श्रेष्ठत्वाच्या प्रचाराला बाजूला सारून "निग्रो' ओवेन्सला मदत केली. ती करत असताना स्वतःचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंग होणार हे त्याला स्पष्टपणे दिसत होतं. पण खिलाडू वृत्तीपुढे त्याला पदक तुच्छ वाटलं असावं. प्रत्येक वेळेला ओवेन्स ओव्हरस्टेपिंग करतोय, हे त्याने त्याच्या नजरेत आणलं. शेवटची उडी ओवेन्सने अत्यंत काळजीपूर्वक सहा इंच अलीकडून मारली तरीसुद्धा त्याने पंचवीस फूटांचं अंतर पार केलं.
त्यानंतर इतरांना खरं म्हणजे काहीच स्कोप नव्हता. जर्मनीच्या लॅक्स लॉंगने त्याला गाठायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही. ओवेन्सने शेवटच्या फेरीत चक्क 26 फूट साडेपाच यार्ड लांब "हनुमान उडी' मारून अस्तित्वात असलेला विक्रम एका फुटाने तोडला. तो विक्रम 1960 च्या रोम ऑलिम्पिक्सपर्यंत अबाधित होता. बदलती तंत्र आणि वाढत्या तंत्रज्ञानाची मिळणारी मदत वगैरे मुळे ऑलिम्पिक्समधील विक्रम दीर्घकाळ टिकत नाहीत. तरीसुद्धा पुढे 24 वर्षे ओवेन्सच्या विक्रमाला जाऊन "भोज्या' करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
लांब उडीचा सोहळा आटोपल्यानंतर लॉंग आणि ओवेन्सने हातात हात घालून संपूर्ण मैदानाला फेरी मारली. मित्रत्वाचा किस्सा इथे संपला नाही. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण करेपर्यंत दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. दुर्दैवाने लॉंग युद्धात मारला गेला. परंतु युद्ध संपल्यावर ओवेन्सने त्याच्या मुलाशी पुन्हा नातं जुळवलं.
दोन दिवसांत दोन सुवर्णपदके? तीन दिवसांत तीन होणार का? हा प्रश्न ओठावर घेऊन दिनांक 5 ऑगस्टला हजारो क्रीडा रसिकांनी राईश स्पोर्टस् फिल्ड स्टेडियमवर गर्दी केली. 200 मीटर्सच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या शर्यती त्या दिवशी होत्या. जेसी ओवेन्सला तिसरं सुवर्णपदक मिळविताना पहाण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते. एका उपांत्य फेरीत मॅट रॉबिन्सन ह्या दुसऱ्या अमेरिकन निग्रोने ओवेन्सच्या 21.1 सेकंदाच्या आलम्पिक रेकॉर्डची बरोबरी केली आणि ओवेन्सच्या पाठीराख्यांच्या छातीत धस्स झालं. चाणाक्षपणे फारसा दम न घालवता "ओवेन्सने दुसरी उपांत्य फेरी 21.3 सेकंदात जिंकली.
देशबांधवांची वागणूक
आठ जागतिक विक्रम आणि चार सुवर्णपदकांनी भरलेली बॅग घेऊन जेव्हा ओवेन्स मायदेशी परतला तेव्हा त्याला काय मिळालं? पुन्हा तीच तिरस्करणीय वागणूक, जी मानवतेची टिमकी वाजवणाऱ्या अमेरिकेत काळ्यांना मिळते. सुवर्णपदक आणि जागतिक विक्रम काही त्याच्या कातडीचा रंग बदलू शकत नव्हते. बर्लिनमध्ये तो जगज्जेता असेलही, पण अमेरिकेत तो साधा निग्रो होता. गोऱ्या वर्णापुढे अमेरिका पदकांना फारसं महत्त्व देत नव्हती. आज स्थिती थोडीफार सुधारली असली तरी, अजूनही निग्रोच्या जीवावर पदकं मिळवणाऱ्या अमेरिकेत त्यांना फारशी किंमत नाहीच. पुढे एकदा ओवेन्स दुःखाने म्हणाला, ""माझ्याशी हिटलरने हस्तांदोलन केलं नाही. त्याचं काही वाटलं नाही, परंतु आमच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्हाईट हाऊसमध्ये बोलावून शाबासकी दिली नाही.'' स्वकीयांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे हताश झालेल्या ओवेन्सने "हौशी' खेळाला रामराम ठोकला आणि तो व्यावसायिक बनला. पैशासाठी तो घोड्यांबरोबर शर्यती धावू लागला. घोड्यांबरोबर माणसांनी धावणं हा विचारच मनाला चटका लावून जातो. पुढे त्याने रेडिओ आणि टेलिव्हिजनमध्येही काम केलं. काळ्या मुलांसाठी शिकागोमध्ये बोर्डिंगही बसवलं. ऑलिम्पिकपासून दूर झाला असला तरी शेवटपर्यंत त्याचा आॅलिम्पिकमधला इंटरेस्ट कायम होता. अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून अमेरिकेने मॉस्को आॅलिम्पिक पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विधात्याला त्याच्या जीवनाची शर्यत त्यापूर्वीच संपविण्याची दुर्बुद्धी झाली. जेसी ओवेन्स नाव धारण करणारं "काळं तुफान' आता इतिहासाच्या पानांत बंदिस्त झालंय. पण जेव्हा जेव्हा आॅलिम्पिक्सची ज्योत प्रज्वलीत होईल, तेव्हा या तुफानाची यादगार निघाल्याशिवाय राहणार नाही. "जेसी ओवेन्स' हे नाव पुसून टाकायचं सामर्थ्य काळातसुद्धा नाही.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या "चॅम्पियन्स महान खेळाडूंची गौरवगाथा' या पुस्तकात क्रीडा विश्वातील विविध खेळातील चॅम्पियन्सची यशोगाथा त्यांनी रेखाटली आहे. त्यात 1936 च्या बर्लिन ऑलिम्पिक्समध्ये जगातील सर्वाधिक वेगवान माणूस ठरणारा जे. सी. ऑपन्स याच्या बद्दलचा लेखसुद्धा द्वारकानाथ संझगिरी यांनी लिहिला आहे. त्याच लेखातील हा उतारा.
तो आला, त्याने पाहिलं, त्याने जिंकलं! त्यानंतर तो तिथे फिरकलाच नाही. पण त्याच्या त्या पराक्रमाची पुण्याई एवढी मोठी होती की, त्यानंतर तो अजरामर झाला. ही कथा आहे जेसी क्लेव्हेलॅन्ड ओवेन्स नावाच्या खेळाडूची ऑलिम्पिकमध्ये शेकडो खेळाडू भाग घेत असतात. पण एखादा खेळाडू क्रीडा कौशल्याची एवढी उच्च पातळी गाठतो की तो संपूर्ण ऑलिम्पिक्स खाऊन टाकतो.
36 चं बर्लिन ऑलिम्पिक्स हे जेसी ओवेन्सच्या पायाशी निगडीत आहे. त्या ऑलिम्पिक्समध्ये त्याने चार सुवर्णपदकांवर आपला हक्क प्रस्थापपित केला. पण केवळ तेवढ्या भांडवलावर तो "दंतकथेत' जमा झाला नाही. जगातील लाखो लोकांच्या आणि विशेषः कृष्णवर्णियांच्या गळ्यातला तो ताईत बनला, त्याने हिटलरच्या वंशश्रेष्ठत्त्वाच्या तत्त्वज्ञानाच्या ठिकऱ्या उडवल्या म्हणून! ओवेन्स-हिटलर हे प्रकरण त्यावर्षी बरंच गाजलं. जर्मन आणि फक्त गोऱ्या त्वचेच्या खेळाडूंना त्याच्या खोलीत बोलावून त्यांच अभिनंदन करणाऱ्या जर्मनीच्या हुकुमशहाने जेसी ओवेन्सचे राकट काळे हात हातात घेणं शेवटपर्यंत कटाक्षाने टाळलं. जसा हिटलर तशी त्याच्या कब्जात असलेली वर्तमानपत्रं! नाझी वर्तमानपत्रे तर निग्रोचं "ब्लॅक आक्झीलियरी' असंच वर्णन करायची.
राज्यकर्त्यांची जरी ही तऱ्हा असली तरी आम जर्मन जनतेने जेसी ओवेन्सवर प्रेमाचा वर्षाव केला. चाहत्यांचा आणि त्याच्या स्वाक्षरीसाठी धडपडणाऱ्यांचा त्याला इतका गराडा पडायला की सह्या करून त्याच्या हातांना त्रास होईल, म्हणून अमेरिकन टीम मॅनेजरने त्याला ऑलिम्पिक व्हिलेजमधून बाहेर पडू नकोस अशी विनंती केली. हुकुमशाहीच्या कोंदट वातावणरातही ओवेन्सचं महात्म्य वाढत गेलं.
विक्रमाची घाऊक मोडतोड
ओवेन्सने बर्लिनमध्ये पाय ठेवण्याअगोदर त्याच्या असामान्य क्रीडानिपुणतेची झलक दाखवलेली होती किंबहुना सात जागतिक विक्रमांचे तुरे डोक्यावर मिरवतच तो बर्लिनमध्ये अवतरला. 25 मे 1935 रोजी हमशीनगनमधल्या आंतरविद्यापीठ स्पर्धेत, घड्याळाचे काटे दुपारी सव्वातीनवरून चारपर्यंत पोहचायच्या आत त्याने सहा जागतिक विक्रम इतिहासजमा करून टाकले होते. मुख्य म्हणजे त्या ऐतिहासिक दिवशी ओवेन्स पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखीने त्रस्त झाला होता. तो शंभर यार्डाच्या धावण्याच्या शर्यतीसाठी उभा राहिला आणि पाठदुखी वगैरे सर्व विसरून त्याने ते अंतर 9.4 सेकंदांत पार केले. नंतर फक्त दहा मिनिटाने त्याने 8.13 मीटर्स लांब उडी मारली आणि तोही जागतिक विक्रम ओवेन्सच्या खिशाल अलगद जाऊन पडला. त्याने चक्क सहा इंचाने बाजी मारली होती. त्यानंतर जागतिक विक्रमांनासुद्धा ओवेन्सचा लळा लागला असावा. कारण काही मिनिटांतच 220 यार्डस, 200 मीटर्स हर्डल्स असे चार धावण्याचे जागतिक विक्रम ओवेन्सला जाऊन बिलगले. केवळ पंचेचाळीस मिनिटांत जेसी ओवेन्स सात जागतिक विक्रमांचा अधिपती झाला होता.
हे काळं तुफान असंच सहजतेने अंतिम फेरीपर्यंत सरकलं. दिनांक 3 ऑगस्टला अंतिम फेरीत पावसाने ओल्या झालेल्या ट्रॅकवर फ्रॅन्क व्हायकॉफ, रास्फ मेटकॉल्फ, रेनार्ट स्ट्रॅन्डबर्ग सारख्या मातब्बर धावपटूंना मागे सारत, जेसी ओवेन्सने 100 मीटर्सचं सुवर्णपदक एक लाख दहा हजार प्रेक्षकांच्या साक्षीने स्वतःच्या मालकीचं केलं. त्याने सर्व प्रेक्षकांना एवढं वेड लावलं होतं की, प्रेक्षकही मनाने ओवेन्सबरोबर धावत होते. तो जगातला सर्वात वेगवान मानव ठरला होता. ज्या नशिबवान डोळ्यांनी त्याला न्याहाळलं ते त्याच्या धावण्याच्या शैलीची तुलना एखाद्या सुंदर बॅले डान्सरशी करत होते. मुख्य म्हणजे ते ज्याला अत्यंत सहज जमत होतं. नैसर्गिक देणगी असल्याप्रमाणे कुठेही फार प्रयत्न ूकरावे लागतायत असा प्रकार नव्हता. 4 ऑगस्टचा दिवसही ओवेन्सच्याच नावावर लिहिला गेला होता. ओवेन्सने उंच उडीचं सुवर्णपदक त्या दिवशी जिंकलं. पण त्याहीपेक्षा एक महत्त्वाची घटना तो दिवस अविस्मरणीय करून गेली. खऱ्याखुऱ्या ऑलिम्पिक स्पिरीटचा प्रत्यय त्या दिवशी आला. "लांब उडी' हे खरं तर जेसी ओवेन्सचं राखीव कुरण होतं. पण त्या दिवशी आश्चर्य घडलं. टेक ऑफ घेताना चूक झाल्यामुळे त्याच्या पहिल्या दोन्ही उड्या बाद ठरविण्यात आल्या. आता फक्त एकच संधी उरली होती. ती हुकली असती तर जगातील सर्वोत्कृष्ट लांब उडी मारणाऱ्या खेळाडूला सुवर्णपदक दूरच राहो, साधी अंतिम फेरीत भाग घ्यायचीसुद्धा संधी मिळाली नसती.
आलिम्पिक स्पिरीट
भांबावलेल्या ओवेन्सला काय चुकतंय हेच कळेना. ऐनवेळी "आर्यन' रक्ताच्या लॅक लॉंगने कानावर सतत पडणाऱ्या आर्यन श्रेष्ठत्वाच्या प्रचाराला बाजूला सारून "निग्रो' ओवेन्सला मदत केली. ती करत असताना स्वतःचं सुवर्णपदक जिंकण्याचं स्वप्न भंग होणार हे त्याला स्पष्टपणे दिसत होतं. पण खिलाडू वृत्तीपुढे त्याला पदक तुच्छ वाटलं असावं. प्रत्येक वेळेला ओवेन्स ओव्हरस्टेपिंग करतोय, हे त्याने त्याच्या नजरेत आणलं. शेवटची उडी ओवेन्सने अत्यंत काळजीपूर्वक सहा इंच अलीकडून मारली तरीसुद्धा त्याने पंचवीस फूटांचं अंतर पार केलं.
त्यानंतर इतरांना खरं म्हणजे काहीच स्कोप नव्हता. जर्मनीच्या लॅक्स लॉंगने त्याला गाठायचा प्रयत्न केला पण तो यशस्वी ठरला नाही. ओवेन्सने शेवटच्या फेरीत चक्क 26 फूट साडेपाच यार्ड लांब "हनुमान उडी' मारून अस्तित्वात असलेला विक्रम एका फुटाने तोडला. तो विक्रम 1960 च्या रोम ऑलिम्पिक्सपर्यंत अबाधित होता. बदलती तंत्र आणि वाढत्या तंत्रज्ञानाची मिळणारी मदत वगैरे मुळे ऑलिम्पिक्समधील विक्रम दीर्घकाळ टिकत नाहीत. तरीसुद्धा पुढे 24 वर्षे ओवेन्सच्या विक्रमाला जाऊन "भोज्या' करण्याची कोणाचीही हिंमत झाली नाही.
लांब उडीचा सोहळा आटोपल्यानंतर लॉंग आणि ओवेन्सने हातात हात घालून संपूर्ण मैदानाला फेरी मारली. मित्रत्वाचा किस्सा इथे संपला नाही. 1939 मध्ये जर्मनीने पोलंडवर आक्रमण करेपर्यंत दोघांचा पत्रव्यवहार चालू होता. दुर्दैवाने लॉंग युद्धात मारला गेला. परंतु युद्ध संपल्यावर ओवेन्सने त्याच्या मुलाशी पुन्हा नातं जुळवलं.
दोन दिवसांत दोन सुवर्णपदके? तीन दिवसांत तीन होणार का? हा प्रश्न ओठावर घेऊन दिनांक 5 ऑगस्टला हजारो क्रीडा रसिकांनी राईश स्पोर्टस् फिल्ड स्टेडियमवर गर्दी केली. 200 मीटर्सच्या उपांत्य आणि अंतिम फेरीच्या शर्यती त्या दिवशी होत्या. जेसी ओवेन्सला तिसरं सुवर्णपदक मिळविताना पहाण्यासाठी त्यांचे डोळे आसुसलेले होते. एका उपांत्य फेरीत मॅट रॉबिन्सन ह्या दुसऱ्या अमेरिकन निग्रोने ओवेन्सच्या 21.1 सेकंदाच्या आलम्पिक रेकॉर्डची बरोबरी केली आणि ओवेन्सच्या पाठीराख्यांच्या छातीत धस्स झालं. चाणाक्षपणे फारसा दम न घालवता "ओवेन्सने दुसरी उपांत्य फेरी 21.3 सेकंदात जिंकली.
देशबांधवांची वागणूक
आठ जागतिक विक्रम आणि चार सुवर्णपदकांनी भरलेली बॅग घेऊन जेव्हा ओवेन्स मायदेशी परतला तेव्हा त्याला काय मिळालं? पुन्हा तीच तिरस्करणीय वागणूक, जी मानवतेची टिमकी वाजवणाऱ्या अमेरिकेत काळ्यांना मिळते. सुवर्णपदक आणि जागतिक विक्रम काही त्याच्या कातडीचा रंग बदलू शकत नव्हते. बर्लिनमध्ये तो जगज्जेता असेलही, पण अमेरिकेत तो साधा निग्रो होता. गोऱ्या वर्णापुढे अमेरिका पदकांना फारसं महत्त्व देत नव्हती. आज स्थिती थोडीफार सुधारली असली तरी, अजूनही निग्रोच्या जीवावर पदकं मिळवणाऱ्या अमेरिकेत त्यांना फारशी किंमत नाहीच. पुढे एकदा ओवेन्स दुःखाने म्हणाला, ""माझ्याशी हिटलरने हस्तांदोलन केलं नाही. त्याचं काही वाटलं नाही, परंतु आमच्या राष्ट्राध्यक्षांनीही व्हाईट हाऊसमध्ये बोलावून शाबासकी दिली नाही.'' स्वकीयांकडून मिळणाऱ्या सापत्न वागणुकीमुळे हताश झालेल्या ओवेन्सने "हौशी' खेळाला रामराम ठोकला आणि तो व्यावसायिक बनला. पैशासाठी तो घोड्यांबरोबर शर्यती धावू लागला. घोड्यांबरोबर माणसांनी धावणं हा विचारच मनाला चटका लावून जातो. पुढे त्याने रेडिओ आणि टेलिव्हिजनमध्येही काम केलं. काळ्या मुलांसाठी शिकागोमध्ये बोर्डिंगही बसवलं. ऑलिम्पिकपासून दूर झाला असला तरी शेवटपर्यंत त्याचा आॅलिम्पिकमधला इंटरेस्ट कायम होता. अफगाणिस्तानच्या प्रश्नावरून अमेरिकेने मॉस्को आॅलिम्पिक पाहण्याची त्याची इच्छा पूर्ण होऊ शकली नाही. विधात्याला त्याच्या जीवनाची शर्यत त्यापूर्वीच संपविण्याची दुर्बुद्धी झाली. जेसी ओवेन्स नाव धारण करणारं "काळं तुफान' आता इतिहासाच्या पानांत बंदिस्त झालंय. पण जेव्हा जेव्हा आॅलिम्पिक्सची ज्योत प्रज्वलीत होईल, तेव्हा या तुफानाची यादगार निघाल्याशिवाय राहणार नाही. "जेसी ओवेन्स' हे नाव पुसून टाकायचं सामर्थ्य काळातसुद्धा नाही.
Monday, July 5, 2010
आता पुढे काय?
(अग्रलेख 6.5.2010)
काल अभूतपूर्व असा शंभर टक्के यशस्वी "भारत बंद' झाला. भारताचे सर्व विरोधी पक्ष प्रथमच बंद पुकारण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या या एकजुटीने कडकडीत बंद झाला. ही एकजूट आधी झाली असती तर पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅसची किंमत वाढविण्याचे धाडसच कॉंग्रेसच्या केंद्रिय सत्तेला झाले नसते. पण विरोधक पूर्ण निष्प्रभ झाल्याने कॉंग्रेस आघाडी सरकार बेपर्वाईने वागू लागले होते. जनतेची होणारी हालअपेष्टा आणि जनतेच्या मनात धगधगणारा संताप याची झळ आपल्यापर्यंत पोचणार नाही अशी खात्री झाल्याने केंद्र सरकार सुस्त पडून होते. गॅसची किंमत 35 रुपयांनी वाढविल्यावर पत्रकारांनी जाब विचारला तेव्हा उत्तर आले की, 35 रुपये ही फार मोठी वाढ नाही. दर दिवशी एक रुपयाच बाजूला ठेवायचा आहे. हे लोकशाहीतील सर्वात भयंकर उत्तर आहे!! केंद्र सरकार असे उत्तर देऊ शकते याला जितके सरकार जबाबदार आहे तितकाच विरोधी पक्ष जबाबदार आहे. विरोधी पक्ष नावाला उरल्यानेच अशी उत्तरे देण्याचे धाडस सत्ताधारी पक्ष करू शकतो.
"भारत बंद' विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यशस्वी केला. पण पुढे काय? विरोधी पक्षांची एकजूट अशीच राहिली तरच केंद्र सरकारवर भाववाढ मागे घेण्याचा दबाव येईल. नाहीतर "भारत बंद' हा विरोधी पक्षांचा प्रसिद्धी स्टंट ठरेल. महाराष्ट्रात पुढील वर्षी पालिका निवडणुका आहेत. बिहार राज्यात चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तयारीत आहे. त्यामुळे बंद नंतर विरोधी पक्षांनी पुढे काहीच केले नाही तर हा बंद म्हणजे निवडणुकांची तयारी होती ही सामान्य माणसांच्या मनातील शंका रास्त ठरेल.
देशात जी स्थिती आहे तीच महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पूर्ण ढेपाळला आहे. आता महापालिका निवडणुका आल्याने विरोधी पक्षाला थोडी धुगधुगी येईल, पण मुळात तेलच नाही तर आग भडकेल कशी? महाराष्ट्रात मराठी भाषेचा गळा घोटला जात होता तेव्हा विरोध नव्हता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय फक्त अधिवेशनात बोंबाबोंब करण्यापुरता वापरला गेला. महाराष्ट्रात पाणी टंचाईच्या भीषण संकटाने शेतकऱ्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वच कासावीस होते तेव्हाही महाराष्ट्राच्या कोणत्याच रस्त्यावर विरोध दिसला नाही. "बेस्ट ऑफ फाईव्ह'चा घोळ झाल्यावरही विरोधाचे वादळ उठले नाही. जनतेला जगणे असह्य झाले तरी महाराष्ट्र थंड होता!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच निर्धास्त असतात. हायकमांड जे सांगेल आणि जसे सांगेल तसे अंमलात आणायचे इतकेच सरकारला ठाऊक आहे. अिलकडे फोनवर बोलतानाही वरून हायकमांडचा काय निरोप येतो हे जाणण्यासाठी मुख्यमंत्री मान वर करून आकाशाकडे बघत बोलतात.
हेडमास्तरचा हा पुत्र चुकून हेडमास्तर झाला. आपण सामान्यांच्या शाळेचे हेडमास्तर आहोत हे हेडमास्तर विसरला आहे. आयसीएसई किंवा सीबीएसई शाळेचे हेडमास्तर असल्यासारखे हा हेडमास्तर वागतो. या श्रीमंतांच्या शाळांची फी 40 हजार वरून 80 हजार केली तरी कुजबूज करण्यापलिकडे पालक काही करीत नाहीत. त्यामुळे हेडमास्तरला काही वाटत नाही. पण मुख्यमंत्री हे पालिकेच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. सिलेंडरची 35 रुपये वाढ असह्य असणाऱ्यांचे हेडमास्तर आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नांदेडच्या शाळेत झालेल्या कडकडीत बंदने त्यांना जागे केले आहे. तेव्हा मुख्यमंत्री आता तरी चष्मा नाकावर अर्धवट न ठेवता पूर्ण वर ठेवा. म्हणजे संपूर्ण "ग्लोबल व्ह्यू' मिळेल.
काल अभूतपूर्व असा शंभर टक्के यशस्वी "भारत बंद' झाला. भारताचे सर्व विरोधी पक्ष प्रथमच बंद पुकारण्यासाठी एकत्र आले आणि त्यांच्या या एकजुटीने कडकडीत बंद झाला. ही एकजूट आधी झाली असती तर पेट्रोल, डिझेल, केरोसीन आणि गॅसची किंमत वाढविण्याचे धाडसच कॉंग्रेसच्या केंद्रिय सत्तेला झाले नसते. पण विरोधक पूर्ण निष्प्रभ झाल्याने कॉंग्रेस आघाडी सरकार बेपर्वाईने वागू लागले होते. जनतेची होणारी हालअपेष्टा आणि जनतेच्या मनात धगधगणारा संताप याची झळ आपल्यापर्यंत पोचणार नाही अशी खात्री झाल्याने केंद्र सरकार सुस्त पडून होते. गॅसची किंमत 35 रुपयांनी वाढविल्यावर पत्रकारांनी जाब विचारला तेव्हा उत्तर आले की, 35 रुपये ही फार मोठी वाढ नाही. दर दिवशी एक रुपयाच बाजूला ठेवायचा आहे. हे लोकशाहीतील सर्वात भयंकर उत्तर आहे!! केंद्र सरकार असे उत्तर देऊ शकते याला जितके सरकार जबाबदार आहे तितकाच विरोधी पक्ष जबाबदार आहे. विरोधी पक्ष नावाला उरल्यानेच अशी उत्तरे देण्याचे धाडस सत्ताधारी पक्ष करू शकतो.
"भारत बंद' विरोधी पक्षांनी एकत्र येऊन यशस्वी केला. पण पुढे काय? विरोधी पक्षांची एकजूट अशीच राहिली तरच केंद्र सरकारवर भाववाढ मागे घेण्याचा दबाव येईल. नाहीतर "भारत बंद' हा विरोधी पक्षांचा प्रसिद्धी स्टंट ठरेल. महाराष्ट्रात पुढील वर्षी पालिका निवडणुका आहेत. बिहार राज्यात चार महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. पश्चिम बंगाल निवडणुकीच्या तयारीत आहे. त्यामुळे बंद नंतर विरोधी पक्षांनी पुढे काहीच केले नाही तर हा बंद म्हणजे निवडणुकांची तयारी होती ही सामान्य माणसांच्या मनातील शंका रास्त ठरेल.
देशात जी स्थिती आहे तीच महाराष्ट्रात आहे. महाराष्ट्राचा विरोधी पक्ष पूर्ण ढेपाळला आहे. आता महापालिका निवडणुका आल्याने विरोधी पक्षाला थोडी धुगधुगी येईल, पण मुळात तेलच नाही तर आग भडकेल कशी? महाराष्ट्रात मराठी भाषेचा गळा घोटला जात होता तेव्हा विरोध नव्हता. शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा विषय फक्त अधिवेशनात बोंबाबोंब करण्यापुरता वापरला गेला. महाराष्ट्रात पाणी टंचाईच्या भीषण संकटाने शेतकऱ्यांपासून सामान्य माणसांपर्यंत सर्वच कासावीस होते तेव्हाही महाराष्ट्राच्या कोणत्याच रस्त्यावर विरोध दिसला नाही. "बेस्ट ऑफ फाईव्ह'चा घोळ झाल्यावरही विरोधाचे वादळ उठले नाही. जनतेला जगणे असह्य झाले तरी महाराष्ट्र थंड होता!
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणूनच निर्धास्त असतात. हायकमांड जे सांगेल आणि जसे सांगेल तसे अंमलात आणायचे इतकेच सरकारला ठाऊक आहे. अिलकडे फोनवर बोलतानाही वरून हायकमांडचा काय निरोप येतो हे जाणण्यासाठी मुख्यमंत्री मान वर करून आकाशाकडे बघत बोलतात.
हेडमास्तरचा हा पुत्र चुकून हेडमास्तर झाला. आपण सामान्यांच्या शाळेचे हेडमास्तर आहोत हे हेडमास्तर विसरला आहे. आयसीएसई किंवा सीबीएसई शाळेचे हेडमास्तर असल्यासारखे हा हेडमास्तर वागतो. या श्रीमंतांच्या शाळांची फी 40 हजार वरून 80 हजार केली तरी कुजबूज करण्यापलिकडे पालक काही करीत नाहीत. त्यामुळे हेडमास्तरला काही वाटत नाही. पण मुख्यमंत्री हे पालिकेच्या शाळेचे हेडमास्तर आहेत. सिलेंडरची 35 रुपये वाढ असह्य असणाऱ्यांचे हेडमास्तर आहेत. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या नांदेडच्या शाळेत झालेल्या कडकडीत बंदने त्यांना जागे केले आहे. तेव्हा मुख्यमंत्री आता तरी चष्मा नाकावर अर्धवट न ठेवता पूर्ण वर ठेवा. म्हणजे संपूर्ण "ग्लोबल व्ह्यू' मिळेल.
Subscribe to:
Posts (Atom)
